तारा पाटील
जिल्हा प्रतिनिधी :-पालघर
ध्यास प्रतिष्ठान च्या माध्यमातून शासकीय आश्रमशाळा मान ता. विक्रमगड येथे २७/६/२०२५रोजी शिव व्याख्यान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘जागर सावित्रीचा ॔ या कवितेच्या ओळी पासून कार्यक्रमाला श्री संजय कमल पासलकर यांनी सुरुवात केली. शिव व्याख्यानातून शाळेतील विद्यार्थीनी, विद्यार्थांना सोप्या भाषेत सहजपणे समजेल असे की आज कालच्या पिढीला कशाची गरज आहे तर ते शिक्षण घेऊन मोठे होण्याची आहे. आज शिवाजी महाराजांनी मोघलाशाही संपवली नसती तर आज आपण वाचलो नसतो. आज आपण जे गड किल्ले पाहतो आणि गड किल्यांवर बिनधास्तपणे फिरलो नसतो. ही आपल्याला केवळ नी केवळ आपल्या शिवरायांच्या आणि मासाहेब जिजाऊंच्या पुण्याई मुळे.
आजकालच्या कलियुगात बुवा, बाबा न पुजता आपल्या शिवरायांना पुजा आणि प्रत्येकाला असे वाटले पाहिजे की नाही मी शिवरायांचा मावळा आहे. कुठल्याही ढोंगी पाखंडी अंधश्रद्धेच्या मागे न लागता आठवा गाडगेबाबा, त्यांनी दिलेल्या शिकवणी आठवा हातावर भाकरी घेऊन खा परंतु शिक्षणाची कास सोडू नका शिकून मोठे व्हावा कोणी डाॅक्टर, वकील, शिवरायांचे मावळे, सावित्रीबाई फुल्यांच्या लेकी व्हा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकरांना आठवा कारकिर्दीत किती ही संकटं आली तरी त्यांनी आपल्या घेतलेल्या आव्हाना कुठे ही न डगमगता शिक्षणाची कास धरली आणि आपल्या देशातीलच नव्हे तर जगाला दाखवून दिले . आज संविधान डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले नसते तर आपली गुलामगिरी संपली नसती. सावित्रीबाई फुल्यांनी जेव्हा मुलींसाठी शाळा काढली तेव्हा त्यांच्या अंगावर शेण टाकले गेले. तरी त्यांनी शिक्षणासाठी मुलींना शाळा काढल्यामुळे आज आपण येथे शिक्षण घेत आहोत.
श्री संजय कमल पासलकर यांनी आजपर्यंत अनेक ठिकाणी शिव व्याख्यानातून शाळेतील मुलांना चांगल्या प्रकारे समजून सांगून अंधश्रद्धा निर्मूलनाचा यातून संदेश दिला.
ध्यास प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आश्रम शाळांना शिव व्याख्यानाचे कार्यक्रम आयोजित करुन भेटी दिल्या आहेत.
१) राजश्री शाहू विद्या निकेतन जव्हार आयरे गाव, २) दिगंबर पडवी आश्रम आंबिस्ते. ता. वाडा, ३) अरविंद स्मृती संचालित आश्रमशाळा नांदणी गाय गोठा. ता. वाडा. ४) प्रतिभा शिक्षण संस्था सरस्वती माध्यमिक शाळा तिलेस. ता. वसई, ५) पद्मश्री अण्णासाहेब जाधव महाविद्यालय परळी. ता. वाडा, ६) शासकीय आश्रमशाळा चिंबी पाडा. ता. भिवंडी, ७) अरविंद संचालित आश्रमशाळा देवगाव ता. वाडा, उल्हासराव भोईर आश्रमशाळा विक्रमगड येथे कुमार देव्यास कदम यांच्या आर्थिक सहकार्याने पंधरा हजार रुपये किंमतीचे दहावीच्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले होते. या कार्यक्रमात शाळेतील शिक्षकांचे चागले सहकार्य लाभले. ‘जागर सावित्रीचा’ श्री संजय पासलकर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला. प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय सानेगुरुजी कथा माले चे कार्यकारीणी सदस्य तुळशीदास तांडेल उपस्थिती होते. श्री ठाकरे सर यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.






















